मुंबई-गोवा महामार्गावर महाड एमआयडीसीजवळील पूल कोसळल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुरुवारी अपघातामध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सरकार दहा लाख रुपयांची मदत करणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे. तसेच अपघातातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी किंवा दहा लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे रेकॉर्डब्रेक वेळेत नवा पूल बांधण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. Maharashtra Government announces Rs.10 lakh compensation each for people who died in Mahad bridge collapse incident. — ANI (@ANI_news) August 4, 2016