हिंदुस्थानचा खरा इतिहास कळण्यासाठी भारतातील सर्व राज्यांत मराठय़ांचा इतिहास शिकवला जावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी खंडाळा येथे सांगितले.

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या आगामी प्रतापगड ते रायरेश्वर गडकोट मोहिमेबद्दल मार्गदर्शन करताना भिडे गुरुजी बोलत होते. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारो तरुण उपस्थित होते.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

भिडे गुरुजी म्हणाले, की छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज हे भारतमातेचे प्राण आहेत. त्यांच्या इतिहासातून राष्ट्रभक्तीचेच धडे मिळतात. छत्रपती शिवरायांनी कसे जगावे याचा तर छत्रपती संभाजीराजांनी कसे मरावे याचा मंत्र दिला. आज राष्ट्रउभारणी आणि त्याच्या रक्षणासाठी देशात सर्वत्र हा इतिहास शिकवण्याची गरज आहे. हिंदुस्थानचा हा जाज्वल्य इतिहास सगळय़ांना समजण्यासाठी देशात सर्वत्र इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात ‘मराठय़ांचा इतिहास’ समाविष्ट करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण तशी मागणी करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आमच्या इतिहासात दडलेले राष्ट्रभक्तीचे धडे आजच्या तरुणाईला मिळाले पाहिजेत असे सांगून ते म्हणाले, की या इतिहासातून सक्षम भावी पिढी तयार होईल. ही अशी पिढी तयार व्हावी यासाठीच गडकोट मोहिमांचे आयोजन केले जाते. यंदा प्रतापगड ते रायरेश्वर या गडकोट मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेअंतर्गत ३० रोजी रायरेश्वर येथे पुन्हा एकदा स्वराज्य उभारणीची शपथ घेतली जाणार आहे. तरी महाराष्ट्रातील धारकरी आणि शिवभक्तांनी यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

यावेळी खंडाळा तालुक्यातील बावडा ग्रामस्थांच्यावतीने रायगडावरील सुवर्ण सिंहासन स्थापनेसाठी एक लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा केली गेली. तालुका कार्यवाहक म्हणून गौरव पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.