Raj Thackeray Slams Shivsena : शिवसेना सातत्याने भाजपाला विरोध करत आहे. यापुढे आम्ही भाजपासोबत निवडणूक लढवणार नाही, नाणार प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. उद्या लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार आहे. त्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते, ते मला बघायचेय असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते औरंगाबादमध्ये एका सभेमध्ये बोलत होते.

शिवसेनेचा भाजपाला एवढा विरोध असेल तर त्याची सुरुवात उद्यापासून अविश्वास प्रस्तावापासूनच होऊं दे असे राज म्हणाले. शिवसेनेने कितीही भाजपाला विरोध दाखलवा तरी ते घरंगळत जाणार हे मला ठाऊक आहे. कितीही विरोध केला तरी ते सत्तेतून बाहेर पडणार नाही. स्वत:च्या तुंबडया भरत रहाणार असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
sharad pawar discussions with congress leaders on five to six disputed seats in maha vikas aghadi
महाविकास आघाडीत अद्याप पाच-सहा जागांवर पेच; शरद पवार, काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा; जागांबाबतचा वाद मिटविण्याचा प्रयत्न
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?

ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता दिली त्यांनी राज्याची वाट लावली आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सत्यानाश केला आहे. बाकीचे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला मनसेची आठवण येत नाही, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

भाजपा इव्हीएमचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला. इव्हीएमबद्दल मी नेहमी बोलतो. अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये घोळ असल्याचे निवडणुकांमध्ये दिसून येत आहे. महापालिका निवडणुकींच्यावेळी आमच्या अनेक उमेदवारांना शून्य मते मिळाली. शून्य मते कशी पडू शकतात ? त्या उमेदवाराला स्वत:चे तर मत पडू शकते की नाही, असा उलट सवाल त्यांनी केला. अशाच प्रकारचे घोळ संपूर्ण देशभरात सुरू आहेत, नाशिकमध्येही असेच झाल्याचे त्यांनी म्हटले..