गुजरात दंगलीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करावे, अशी सूचना केली होती. मात्र मोदींनी तो आजवर पाळला नाही, असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. काँग्रेसची मते विभागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी असल्याची टीका त्यांनी केली.  डॉ. जया द्वादशीवार यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. आज देश जाती, धर्माच्या नावावर विखुरला जात आहे. अशा स्थितीत राजकारण्यांनी स्वत:ला सांभाळणे गरजेचे आहे. मात्र राजकारणी हे करू शकत नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे असे त्यांनी सांगितले.