प्रबोध देशपांडे, अकोला

विदर्भात दुष्काळात होरपळणाऱ्या बुलढाणा जिल्हय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सन २०१८ मध्ये आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांमध्ये एक हजार १४२ आत्महत्या झाल्यात. त्यापैकी बुलढाणा जिल्हय़ातील आकडा  ३१२ आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

विदर्भातील शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. त्यावर मात करत शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतो. त्यालाही कुठे तरी मर्यादा येतात आणि परिस्थितीपुढे हतबल होऊन तो आत्महत्या करतो.  विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये २००१ पासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्या थांबाव्या म्हणून विशेष पॅकेज व अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने आत्महत्या सुरूच आहेत. एकेकाळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्य़ात झाल्याची नोंद होती.  २०१४ पासून बुलढाणा जिल्हय़ात आत्महत्या वाढत आहेत. मागील  दोन वर्षांत प्रत्येकी ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

शासनाचे अपयश कारणीभूत

शेतकरी सर्व बाजूने संकटात आहे. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून कुठलेही प्रयत्न होत नाही. उलट शेतकऱ्यांची अक्षरश: छळवणूक सुरू आहे. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. बुलढाणा जिल्हय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणे ही अत्यंत खेदाची बाब असून, यावर तात्काळ उपाययोजना करावी.

– दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव.