लोकमान्य टिळक टर्मिनस एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डबे घसरल्याची घटना रविवारी सकाळी घडली.   कोकण रेल्वे मार्गावर मडगावच्या बालीजवळ आज सकाळी साडे सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात अद्याप कोणत्याही जीवित हानीचे वृत्त नाही.  मात्र, अपघातानंतर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र या मार्गावर धावणा-या अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक फिसकटले आहे.