मुंबई – गोवा महामार्गावर लांजा तालुक्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिल व सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. तर सात जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई – गोवा महामार्गावर वाकेडघाटीजवळ भरधाव कारने ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कारमधील प्रवासी हे मुंबईहून राजापूरला जात होते. राजापूर ५० किलोमीटर अंतरावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील मृत प्रवासी हे राजापूर कोंड्ये गावचे रहिवासी होते. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

bus-two wheeler accident, Grand daughter died,
बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
buldhana, Fatal Accident, Samruddhi Highway, One Dead Three Injured, near dusarbid, sindkhed raja taluka, accident on samruddhi mahamarg, accident buldhana samrudhhi
‘समृद्धी’वर मालवाहू वाहनांची धडक; चालक जागीच ठार, तिघे गंभीर
uran, irresponsible, heavy vehicle parking, cause accident, jnpt palaspe national highway, marathi news,
उरणमध्ये बेदरकार अवजड वाहनांची दहशत कायम

प्रियंका उपळकर (वय २९), पंकज घाणेकर (वय १९), भार्गवी माजळकर (वय सहा महिने), मानसी माजळकर (वय ३०) अशी या मृतांची नावे आहे. तर एका मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. गणेश उपळकर (वय २६), लहू उपळकर (वय १८), अंकूश उपळकर (वय १८), हनुमंत शंकर भाजळकर (वय ३५, बसचालक), नितीन शांताराम जाधव (वय ३४), संदेश शंकर कांबळे (वय २१, क्लीनर), प्रमोद प्रभाकर माजळकर अशी जखमींची नावे आहेत.