अनैतिक संबंधाच्या कारणावरून पौळ पिप्रीत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिरसाळा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आष्टीत विवाहित प्रेमीयुगुलाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली.
परळी तालुक्यातील पौळ िपप्री येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास श्रीकिशन नारायण िशदे या तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. यात िशदेचा जागीच मृत्यू झाला. अनतिक संबंधाच्या कारणावरून हा प्रकार घडला. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून या तिघांवर सिरसाळा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुरुवारी सायंकाळी आष्टी तालुक्यात प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. धामणगाव येथील युवक जितेंद्र चौधरी (वय २७) व कारखेल येथील विवाहिता वैशाली जाधव यांच्यात काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधाला होणाऱ्या विरोधाला कंटाळून दुपारी दुचाकीवरून दोघेही किन्ही गावाजवळील शेलार परिसरात आले. या ठिकाणी काही वेळानंतर िलबाच्या झाडाला जितेंद्रने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तरुणीनेही विष प्राशन केले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर विष प्यायलेल्या महिलेला नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र, तिचाही मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.