भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागच्या चारवर्षात १ कोटी २५ लाख घरे बांधण्यात आली आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी शिर्डीत बोलताना केला. याआधी सुद्धा प्रयत्न झाला. पण गरीबांना घर देऊन त्यांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचा प्रचार करण्यावर जास्त भर होता. वोट बँक तयार करण्याचा त्यामागे उद्देश होता असे मोदी म्हणाले. त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली. अपना घर जीवन को आसान बना देता है और गरीबी से लड़ने का नया उत्साह पैदा करता है। इसी को ध्यान में रखते हुए सरकार ने 2022 तक देश के हर बेघर-गरीब परिवार को अपना घर देने का लक्ष्य रखा है। मुझे खुशी है कि करीब-करीब आधा रास्ता हम तय कर चुके है: PM @narendramodi — PMO India (@PMOIndia) October 19, 2018 आधीच्या सरकारच्या कार्यकाळात एक घर बनवायला सरासरी १८ महिने लागायचे. आज १२ महिन्यापेक्षा कमी वेळात घर बांधून पूर्ण होत आहेत. याआधीचे सरकार असते तर १ कोटी २५ लाख घरे बांधायला २० वर्ष लागली असती. म्हणजे तुमचे घराचे स्वप्न पूर्ण व्हायला २० वर्ष लागली असती असे मोदी म्हणाले. कोशिशें पहले भी हुई हैं, लेकिन दुर्भाग्य से उनका लक्ष्य गरीबों को घर देकर सशक्त करने के बजाय, एक विशेष परिवार के नाम का प्रचार करना अधिक रहा है। घर अच्छा हो, उसमें शौचालय हो, बिजली हो, पानी हो, गैस का कनेक्शन हो, इस पर पहले कम ही ध्यान दिया गया: PM @narendramodi — PMO India (@PMOIndia) October 19, 2018 घरामुळे जीवन सोपे होते आणि गरीबीविरोधात लढण्यासाठी बळ मिळते. २०२२ पर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तिला घर देण्याचे आम्ही लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यातील निम्मा मार्ग आम्ही पूर्ण केल्याचा आनंद आहे. आम्ही घराचे आकारमानही वाढवले आहे. घर बांधण्यासाठी मिळणारी ७० हजार रुपयांची सरकारी मदत वाढवून १ लाख २० हजार रुपये केली आहे असे मोदी म्हणाले.