मुंबईतील गोरेगावमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यासह पथकावर ड्रग्ज तस्करांनी हल्ला केल्याची घटना रविवारी घडल्याचं समोर आलं. हल्ला करणाऱ्यांपैकी काहीजणांना अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजपानं कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रात जंगलराज आणताय का?, असा सवाल केला आहे. गोरेगावमध्ये एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी एनसीबीचं पथक गेलं होतं. त्यावेळी ही घटना घडली होती. या घटनेबद्दल भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. "मुंबईत ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला. ड्रग्ज रँकेट उघडे पडू नये म्हणून असे हल्ले कोण घडवून आणतेय? कुणाला सत्य समोर येईल याची भीती वाटतेय? हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?," असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला.. ड्रग्ज रँकेट उघडे पडू नये म्हणून असे हल्ले कोण घडवून आणतेय? कुणाला सत्य समोर येईल याची भिती वाटतेय? हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन जंगलराज आणताय का महाराष्ट्रात? — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 23, 2020 गोरेगावात काय घडलं? कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथक गेलं होतं. ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती. गोरेगावमध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती. हल्ल्यानंतर कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं आहे. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.