नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकानं बंद झाली असा टोला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मारला आहे. नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकानं बंद झाल्यानेच काही लोक समाजात जातीय तणाव निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

जो ज्या जातीचा असतो तो कधीच त्या जातीचा विकास करत नाही, तसंच जो ज्या भागाचा नेता असतो तो तिथला विकास करत नाही हे सत्य आहे, असंही नितीन गडकरी यावेळी म्हणाले आहेत

यावेळी नितीन गडकरी यांनी मराठवाड्याला केंद्रीय जलसंधारण विभागाकडून एक लाख कोटीचा निधी देत असल्याची घोषणा केली. सोबतच जलयुक्त शिवारच्या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लातूरला रेल्वेने पाणी दिलं तो महाराष्ट्रातील काळा दिवस होता असंही ते यावेळी बोलले आहेत.