पुण्यात शिक्षण घेताना विविध महाविद्यालयीन निवडणुका पवार पॅनेलच्या माध्यमातून लढवल्या आणि जिंकल्याही. या निवडणुकीमध्ये विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थी असायचे. तेव्हापासून आजपर्यंत संघटन करण्याचे काम केले. आज राजकारणातील कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण होत असून पुण्याच्या त्या निवडणुका हाच त्याचा पाया आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पुणे शहराविषयीच्या जुन्या आठवणींना सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान उजाळा दिला. या मुलाखतीत आता पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का?, असा प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी केला असता. त्यावर आता निवडणूक नाही असे सांगत पवारांनी उत्तर देणे टाळले.

जुन्या पुणे शहराच्या छायाचित्रांचे कॉफीटेबल बुक ‘पुणे एकेकाळी ‘आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यानी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महा विद्यालयीन जीवनापासून आज अखेर पर्यंतच्या पुणे शहरातील अनेक आठवणीना उजाळा देखील दिला. तर यावेळी लेखक मंदार लवाटे, पेपरलीफचे संस्थापक जतन भाटवडेकर उपस्थित होते.

पानशेत धरण फुटल्यानंतरची एक आठवण सांगताना शरद पवार म्हणाले की, ‘पानशेत धरण फुटल्यानंतर शहराचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होते. महाविद्यालयात असताना. आम्हाला फिझिकल एज्युकेशनचे सर होते. त्यांचे घर पाण्यामध्ये वाहून गेले होते. ते अतिशय दुःखी होते. रडत बसले होते. सर सर्व ठीक होईल. असे आम्ही त्यांना सांगत होतो. त्यावर ते म्हणाले जर्मनी ऑलिम्पिक मध्ये मिळवलेले पदक वाहून गेले आहे. त्याचे मला फार दुःख आहे. त्यांच्या या वाक्यातून देश आणि खेळावर असलेली निष्ठ दिसते.’

तुम्हाला पुण्यात कोणते पदार्थ खाण्यास आवडत त्यावर श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘एस.पी समोर जीवनामध्ये चहा बटाटेवडा, भेळ आणि पदार्थ. तेवढ्यात शरद पवार म्हणाले, ‘पाटील कासमचा खिमा विसरलात का?’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. “आम्ही गावाकडून शहरात शिकण्यास आलो. पुण्यात अनेक ठिकाणी फिरलो. त्यावेळी काही हॉटेल मध्ये जेवणासाठी नेहमी जायचो. घरून महिन्याच्या खर्चासाठी पैसे दिले जायचे. त्यामध्ये शरद राव, मी आणि धनाजी आमच्या तिघा मित्राचा खर्च लिहिला असायचा तो खर्च घरी देत असत. आज ही त्यावेळीची वही जपून ठेवली आहे, अशा आठवणी श्रीनिवास पाटील यानी सांगितल्या.”