महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आज (सोमवार, 17 मार्च) वाढदिवस. मात्र, राज्यावर ओढवलेल्या गारपिटीच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या शुऊेच्छा देण्यासाठी लावण्यात येणारे फ्लेक्स, वर्तमानपत्रातील जाहिराती, फुलांवर खर्च होणारी रक्कम जमा करून ती रक्कम राज्यातील गारपिटग्रस्तांना देण्यात यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्य दुष्काळाला सामोरं जात आहे. त्यात यावर्षी पीक हाताशी आलं असताना गारपिटीने शेतक-यांच्या स्वप्नांना झोडपलं. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं योग्य ठरणार नाही, त्यापेक्षा लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी गारपिटग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.