गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने उस्मानाबादमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार नुकताच घटला. या घटनेनंतर खा. छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत आरक्षण गेलं खड्ड्यात; पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. उस्मानाबादमधील देवळाली या गावातील मराठा समाजातील शहाजी देवकर या युवकाने आपले आयुष्य संपवले. त्याला 94 टक्के गुण मिळूनही त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. याचाच दाखला देत संभाजीराजे यांनी सर्वांना मोफत शिक्षण देण्याची मागणी केली. 94 टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळणे ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले अतोनात कष्ट घेऊन गुणांची कमाई करीत असतील आणि तरी त्या गुणवत्तेला न्याय मिळत नसल्याने माझ्या मनात संतापाची भावना आहे. यासाठी किमान बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत करावे. राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजसह सर्व घटकांना आरक्षण दिले होते, त्यांच्या कार्याची अनुकरण केले पाहिजे. मला सरकारला दोष द्यायचा नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा! — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019 यामध्ये नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे.केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षंच नाही असं समजू नका. 'शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये' असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते,ते आजही तंतोतंत खरे आहे — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019 मला वाटतंय की आपल्या 'व्यवस्थेतच' मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही? असे अनेक प्रश्न राज्यासमोर आवासून उभे आहेत — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019 गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक आणि ज्यांच्या मुळे आपलं आज जीवंत असणं सुरक्षित आहे ते शेतकरी, ह्या सर्वांना असुरक्षित कां वाटतंय ? कां म्हणून ते स्वतःला संपवत आहेत. — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019 समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. 'योग' करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत?? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय?? — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019 उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवले आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला ९४% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता! — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 21, 2019 त्यांच्या ट्विटनंतर अनेकांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया आल्या. दहावीत 94 टक्के मार्क असलेल्या एका मराठा विद्यार्थ्याने अकरावीत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही म्हणून आत्महत्त्या केली. त्यामुळे उद्विग्न होऊन खासदार संभाजी यांनी हे ट्विट केले. आरक्षण संपवल्याने अशी स्थिती येणार नाही हा त्यांचा समज झालेला दिसतो, असे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले. अनुसूचित जातीचाच कट ऑफ 95 टक्के आहे. या मुलाला 94 टक्के होते. त्यामुळे खा. संभाजीराजे भोसलेंचा आरक्षणावरील राग अनावश्यक आहे, असेही मत एकाने व्यक्त केले आहे.