तब्बल पाच ते सहा किलो वजनाचे सेंद्रीय पध्दतीच्या रताळ्याचे उत्पादन भाटकी (ता.माण) येथील वसंत शिर्के यानी शेतात घेतले आहे. रताळ हे कंदमुळ पिकाचा प्रकार असुन जेवणातील उपवासात याचा वापर केला जातो. तब्बल पाच ते सहा किलो वजनाचे सेंद्रीय पध्दतीने पिक घेतले आहे. दहा गुंटे क्षेत्रात सुमारे साठ हजार रुपयांचे ऊत्पन्न मिळेल असा विश्वास शिर्के या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. म्हसवड (ता माण) पासुन सुमारे पाच किलोमिटर अंतरावर भाटकी हे सुमारे बाराशे लोकवस्तीचे गाव आहे. सध्या नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. रताळास मोठी मागणी आहे. शिर्के यांच्या शेतात पाच ते सहा किलो वजनाचे रताळे आले आहेत. या भागात वेळोवेळी झालेल्या पावसामुळे या पिकास पोषक वातावरण असल्यामुळे भरघोस पिक उत्पादन हाती लागले असल्याचे शिर्के यांनी सांगितले.