पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या ५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे सूर्या नदीवरील धामणी धरण ९५ टक्के भरले आहे. या धरणाचे पाचही दरवाजे ३ फुटापर्यंत उघडण्यात आले असून १६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

या विसर्गामुळे धामणी धरणाच्या खालच्या बाजूला असणारा कवडास उन्नती बंधारा ओव्हरफ्लो झाला असून त्यातून ४२,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई
water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा

आठवडाभर सातत्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने सुर्या नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.