स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची मुलगी भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळात आहे. त्यांनी वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर मंत्रीपदाला लाथ मारून बाहेर पडायला हवे होते. परंतु तसं त्यांनी अद्याप केलेली नाही अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी केली आहे. पाथर्डी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली हे सांगितले जात आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी झाली पाहिजे. दिल्लीत झालेल्या अपघातात चालकाची चूक होती तर त्याला शिक्षा का झाली नाही. की तो अपघात घडवण्यात आला याबद्दल संशय व्यक्त होत आहे असे सांगतानाच राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर त्यांच्या मृत्यूची चौकशी करणार असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे.

तुम्हाला फसवणारी टोळी दिल्लीत आणि राज्यात आली आहे आणि हीच टोळी घालवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केलं.