भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नको असं वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तवव्याचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मतावर निवडून येऊन शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या आमदाराचा निषेध करतो असे मत शिवसेना अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. दानवे यांनी बंब यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.  प्रशांत बंब यांनी विधानसभेत केलेली मागणी संवेदनाहीन आहे. आयात निर्यात धोरणाच्या अस्थिरतेमुळे, तसेच शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात आहेत. असं असताना शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेल्या आमदाराकडून अशी मागणी होते. ही एकप्रकारे शेतकऱ्यांशी गद्दारी असल्याचं दानवे म्हणाले.