रायगड जिल्हयाच्या काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली . कर्जत , खालापूर , सुधागड तालुक्यासह रोहा तालुक्याच्या काही भागात संध्याकाळी जोरदार वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला . दरम्यान ग्रामीण भागातील घर, शाळेवरील पत्रे उडाली . नागरिकांचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे. वीजेचे खांब कोसळून पडल्याने अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडीत झाला होता . या पावसाचा फटका उन्हाळी भातपीकालाही बसला आहे . शेतात कापून ठेवलेले भाताचे भारे भिजून गेले आहेत . जिल्हयात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता . पुढील चार ते सहा तासांच्या दरम्यान कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व बेळगावमधील काही भागात जोरदार वारा, ढगांच्या गडगडाटासह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून दुपारी वर्तवण्यात आली होती.