मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडल्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. महामार्गावरील कंटेनर बाजूला करण्यासाठी तब्बल दिडतासापासून प्रयत्न सुरु आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी महामार्गावर वाहतुक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाण्याची वाहतूक ठप्प झाल्यानंतर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासन लवकरात लवकर कंटेनर बाजूला करुन महामार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंटेनर बंद पडल्यामुळे पुणे- मुंबई दरम्यानची एसटीची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.