लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला रोजगार नाही. अशात कोणत्या ग्राहकांनी किती वीज वापरली याची खातरजमा न करता वाढीव वीज बिलं पाठवण्यात आली आहेत. सरकारने ही वीज बिलं माफ केली नाहीत तर प्रसंगी शॉकही देऊ असं वक्तव्य आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. दूध दरवाढीसंदर्भात आंदोलन केल्यानंतर आता वीज बिलांवरुन राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.कोल्हापूरमध्ये वीज बिलांबाबत आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे आक्रमक वक्तव्य केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधला घटक पक्ष आहे. मात्र सामान्य माणसांच्या प्रश्नावरुन ते सरकारविरोधात उभे ठाकले आहेत.