कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी महामार्गावर केरली येथे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. केरली जवळ रस्ता ५० फूट खचला असल्याने जोतिबाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. करवीर पोलीस ठाणे हद्दीतुन जाणारा कोल्हापुर ते रत्नागिरी या राज्य मार्गावर रेडेडोह येथे पाणी आले असून सीपीआर चौकात बॅरेकेटींग लावुन वाहतुक बंद करून वळवण्यात आली आहे.

तसेच केरली फाटा येथेही बॅरेकेट उभारून वाहतुक वळवण्यात आलेली आहे. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यास वाहतुक वळविणबाबत कळवले आहे. रात्रीसाठी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला आहे.