तिघांना पोलीस कोठडी

तलवार हल्ला करून एकाचा खून तर एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी तिघांना आज न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चायनीजच्या गाडय़ांवर झालेल्या भांडणातून हा हल्ला झाला होता. तरुणाच्या टोळक्याने नाष्टा सेंटरमध्ये बसलेल्या दोघांवर तलवारीसह लोखंडी रॉडने हल्ला केला होता.

याबाबत माहिती अशी की, अजय बसागरे आणि श्रीकांत मुगलवाढ या दोघांवर साळिशगे रोडवर आरफा नाष्टा सेंटरवर नाष्टा करीत असताना दहा जणांच्या टोळीने तलवार, कोयता आणि लोखंडी रॉड यांनी हल्ला केला. या हल्ल्यात बसागरे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला तर मुगलवाढ याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी आकाश पवार, विजय काळोखे आणि सागर गायकवाड या तिघांना रात्रीच पोलीसांनी अटक केली आहे.

या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता १ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, जखमी मुगलवाढ  याने दिलेल्या तक्रारीनुसार या हल्ल्यामध्ये आठ ते दहा जणांचा समावेश होता. त्यापकी काही जणांना आज पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.