सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई व खंडाळ्यात भागात आज(रविवार) ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कवठे (ता.खंडाळा) येथील दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. तर, कळंबे (ता. सातारा) येथील मंदिराच्या घुमटावर वीज कोसळल्याने नुकसानही झाले.
सातारा, पाचगणी, महाबळेश्वर, वाई शहरासह ग्रामीण भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. आज दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. सर्वत्र आभाळ भरून आले होते. दुपारी तीन वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली, अन् काही वेळात मुसळधार पाऊस झाला.

दरम्यान, कवठे (ता.खंडाळा) येथे शेतातील सकाळचे काम संपवून जेवण करण्यासाठी कोपीमध्ये बसलेल्या शशिकांत दादासाहेब लिमन (वय ३५, झगलवाडी ता.खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय ६०,कवठे ता.खंडाळा)  यांच्या अंगावर वीज पडल्याने या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला . या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
silver paduka was stolen from the Gavdevi temple at Kachore in Dombivli
डोंबिवलीतील कचोरे येथील गावदेवी मंदिरातील चांदीच्या पादुका चोरीला
शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू ; नाशिक जिल्ह्यातील घटना

कळंबे (ता. सातारा) येथील ग्रामदैवत चारशे वर्षांपूर्वीच्या श्री भैरवनाथ मंदिराच्या घुमटावर वीज कोसळून मंदिराचे नुकसान झाले.२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला होता.