करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा आजपासून (२३ नोव्हेंबर) सुरू होत असून जिल्ह्य़ातील ४५८ पैकी २०७ शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी लावणार आहेत.

अर्थात अशा प्रकारे प्रत्यक्ष अध्यापन-अध्यनासाठी शासकीय शर्तीनुसार जिल्ह्य़ातील ९ ते १२ वीच्या फक्त २ हजार २८१ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र दिली आहेत. पालकांची संमती मिळेल तशा शाळा सुरु कराव्यात, अशी सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांंना व शिक्षकांना मुखपट्टी बंधनकारक आहे. शाळेत उपस्थित राहण्यापुर्वी शिक्षकांना करोना चाचणी बंधनकारक आहे. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी ३, तर खेड तालुक्यातील १ शिक्षक करोनाबाधित आढळले आहेत.

रायगडमध्ये ५४५ शाळा सुरु

अलिबाग : रायगड जिल्ह्य़ात पनवेल महापालिका क्षेत्र वगळता इयत्ता  नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुमारे ५४५ शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.