नाशिक येथे अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील कामगारांना त्यांच्या रोज्यात सोडण्यासाठी काल विशेष रेल्वे गाडी सोडण्यात आली होती. त्यानंतर आज उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना झाली. नाशिक येथे कामानिमित्त वास्तव्याला असलेल्या साडेआठशे नागरिकांना घेऊन ही गाडी निघाली आहे. जाताना गाडीत त्यांना खाण्यापिण्याचं साहित्यही पुरवण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि जेवण तसेच बिस्किटं असे पदार्थ त्यांना प्रशासनाने सोबत दिले आहेत. नाशिकमधून आज ८५० नागरिकांना घेऊन उत्तर प्रदेश लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. प्रशासनाकडून त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व जेवण-बिस्किट देण्यात आली. रेल्वे सुटल्यानंतर या नागरिकांनी 'जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. pic.twitter.com/kwCziqTV52 — LoksattaLive (@LoksattaLive) May 2, 2020 नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकातून ही विशेष रेल्वे सुटल्यानंतर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी 'जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद' अशी घोषणाबाजी केली. तसेच देश म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दल आत्मविश्वास आज आणखी वाढला अशी प्रतिक्रियाही एका प्रवाशानं दिली.