‘१ मे’ हा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय विदर्भवाद्यांच्या बैठकीत झाल्याची माहिती श्रीहरी अणे यांनी दिली. ‘१ मे’ला सर्व विदर्भवादी संघटना मिळून स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकवणार असल्याचेही अणेंनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाच्या भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर अणे पत्रकारांशी बोलत होते. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून यापुढे आमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करू, शांत बसणार नाही, असा इशारा अणेंनी यावेळी दिला. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें यांच्यासोबत चर्चा करून त्यांना वेगळ्या विदर्भाचे महत्त्व पटवून द्यायला तयार आहे. यासंदर्भात मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्ही विदर्भाचा विकास करू शकलो नाही तर स्वत:हून विदर्भ स्वतंत्र करू, असे आश्वासन दिले होते, असे सांगितले.

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Uddhav thackeray
हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा संघर्ष; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड