मुंबई: देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका आहे, त्या संदर्भात त्यांनी केलेली टीका काँग्रेसने सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला आहे.  काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, अशी टीका पवार यांनी के ली होती. त्याला काँग्रसेचे ज्येष्ठ नेते व  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी काँग्रेसलाच पवारांची टीका सकारात्मक पद्धतीने घेण्याचा सल्ला दिला.