गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली परिसरात आज रविवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर एटापल्ली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यात सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. तसेच घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

 

(संग्रहित छायाचित्र)