कॉपीच्या प्रकारात वाढ ; प्रशासनाचे दुर्लक्ष चिंताजनक

दहावी, बारावीच्या परीक्षेत गेल्या ३० वर्षांपासून अतिशय परिश्रमपूर्वक लातूरच्या विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक यांनी एकत्रित केलेल्या मेहेनतीतून गुणवत्तेचा ‘लातूर पॅटर्न’ उदयाला आला होता. गेल्या काही वर्षांत गुणवत्तेबरोबरच शिक्षणक्षेत्रातील वाढत्या गरव्यवहारामुळे गालबोट लावण्याचे प्रकार जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर घडत आहेत. आठ वर्षांपूर्वी परीक्षेच्या काळातील गरव्यवहार रोखण्यासाठी प्रशासनाने लक्ष घातले व कॉपीविरोधात मोहीम राबवली. त्यातून गरप्रकाराला काही प्रमाणात आळा बसला, मात्र पुन्हा एकदा गरप्रकार डोके वर काढत असून प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष झाले आहे.

हमखास यशासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातील विद्यार्थीही लातूरमध्ये शिक्षणासाठी येऊ लागले. सातत्याने दहावी, बारावीच्या परीक्षेतील यशावर लातूरने आपली मोहोर कायम ठेवली. शहरी भागात गुणवत्तेसाठी जसे परिश्रम घेतले जात होते त्याच वेळी ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्रातून गरव्यवहार चालत असे. अर्थात असे गरव्यवहार करून गुणवत्ता वाढत नाही तर परीक्षेचा निकाल वाढतो त्यामुळे शाळेचा निकाल टिकून राहतो. पर्यायाने शिक्षकांच्या नोकरीची हमी मिळते. त्यातून अनेक परीक्षा केंद्रे हमखास पास होण्यासाठी प्रसिद्ध झालेली होती. अशा परीक्षा केंद्रातून परीक्षा द्यायला मिळावी यासाठी राज्यातील अनेक जिल्हय़ांतील विद्यार्थी प्रयत्न करत होते.

गुणवत्तेच्या पॅटर्नबरोबर हा कॉपी पॅटर्न मोडीत काढण्यासाठी २००९ साली लातूर, उस्मानाबाद व नांदेड या लातूर परीक्षा मंडळातील तीन जिल्हय़ांतील जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले. महसूल अधिकाऱ्यांनी कॉपीविरोधात ठोस कारवाई करण्याचे ठरवले व यावर्षी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांवर कॉपीची प्रकरणे दाखल करण्यात आली. लातूर परीक्षा मंडळाचा निकाल अत्यंत कमी लागला त्यामुळे अनेकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. त्यानंतर २०१० मध्ये ७०० विद्यार्थ्यांवर कॉपीविरोधी खटले दाखल करण्यात आले. त्यामुळे नंतरची दोन, तीन वष्रे कॉपीची प्रकरणे कमालीची कमी झाली होती.

दोन्ही पदे अतिरिक्त

या वर्षी पुन्हा कॉपीच्या प्रकरणाने उचल खाल्ली आहे. महसूल विभागाने गेल्या चार वर्षांपासून या विषयातील आपले लक्ष काढून घेतले आहे. अर्थात त्यांच्यासमोर अनेक विषय असल्यामुळे पुन्हा याही विषयात त्यांनीच सातत्याने लक्ष घालावे अशी अपेक्षा करणेही गर आहे. परीक्षा मंडळाचा कारभार हा पूर्णपणे प्रभारी मंडळीच्या हातात आहे. अध्यक्ष व सचिव ही दोन्हीही पदे रिक्त असल्यामुळे प्रभारी व्यक्तींना आपले दैनंदिन काम करत हा अतिरिक्त भार सांभाळावा लागतो.

या वर्षी बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता. निलंगा तालुक्यातील शिवणी कोतल गावातील श्यामगीर विद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा सुरू झाल्यानंतर अध्र्या तासाच्या आतच प्रश्नपत्रिका बाहेर आली व त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांच्या मित्रपरिवारांत परीक्षार्थीना साहाय्य करण्यासाठी अहमहमिका सुरू झाली. हा प्रकार केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेसाठी तनात करण्यात आलेले बठे पथक राजरोसपणे पाहात होते. अशा प्रकारांना विरोध करणे म्हणजे अकारण विद्यार्थ्यांच्या विकासात आपण आड येऊ असे वाटल्यामुळे ते गप्प राहिले, मात्र त्यांच्या दुर्दैवाने या गरप्रकाराची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. परीक्षा विभागाने केंद्र संचालकांना तातडीने बदलले व या गरप्रकारासंबंधी थेट पोलिसात तक्रार दाखल केली.

सर्रास कॉपी

हा प्रकार ताजा असतानाच राज्यशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशी देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून शिवणीकोतलसारखाच प्रकार घडला अन् प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यामुळे परीक्षाथींची सर्व प्रकारची सोय झाली. याही प्रकरणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. या पेपरफुटीप्रकरणी देवणीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी देवणी पोलिसात केंद्र संचालक आर. बी. कांबळे, पर्यवेक्षक बी. एम. होनराव, सेवक सतीश बिराजदार व एका विद्यार्थिनीच्या विरोधात तक्रार दाखल केली.

बारावीच्या परीक्षेतील हे गरप्रकार सुरू असतानाच दहावीच्या परीक्षा ७ मार्च रोजी सुरू झाली. मराठीचा पेपर पहिल्या दिवशी होता. जिल्हय़ातील जळकोट या तालुका केंद्राच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रावर मोठय़ा संख्येने पालक व विद्यार्थी कॉपी पुरवण्यासाठी झुंडीने जात असल्याचे चित्रही प्रसारमाध्यमांतून समोर आले. या परीक्षा केंद्रावर केवळ दोन होमगार्ड तनात करण्यात आले होते. पर्यवेक्षक, केंद्र  संचालक ही मंडळी गप्प होती. याच दिवशी लातूर तालुक्यातील बोरी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर गावातील कमला नेहरू विद्यालयातील सुमारे ३५ विद्यार्थी अर्धा तास उशिषरा परीक्षा देण्यासाठी आले. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांकडे परीक्षा मंडळाने जे हॉलतिकीट पुरवले होते त्यावर एकाही विद्यार्थ्यांचे छायाचित्र नव्हते. तेथील पर्यवेक्षकांनी ही बाब परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्याच्या कानावर घातली तेव्हा विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेऊन त्यांना परीक्षेला बसू द्या. याचा फटका विद्यार्थ्यांला बसायला नको अशी भूमिका घेण्यात आली. संबंधित शाळेला विद्यार्थ्यांचे ओळखपत्र पाठवण्यासाठी सांगूनही त्यांनी ते पुरवले नाही.

याच दरम्यान निलंगा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रातील दोन पर्यवेक्षकांनी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदतीची भूमिका वठवली नाही याचा राग मनात धरून त्या गावातील मंडळींनी परीक्षा झाल्यानंतर संबंधितांना बदडले. मात्र याची तक्रार पोलिसात देऊन आपली नोकरी त्या गावात करणे अडचणीचे जाणार असल्यामुळे संबंधितांनी तक्रारच दिली नाही. त्यामुळे या बाबी प्रसारमाध्यमांना समोर आणणेही अवघड झाले.

एका जिल्हय़ात परीक्षा सुरू होऊन आठवडाही उलटला नाही तर गरप्रकाराची एवढी मोठी मालिका सुरू आहे. परीक्षा केंद्र सुरू ठेवण्यासाठी नियम धाब्यावर ठेवून परीक्षा मंडळातील अधिकारी संस्थाचालकांना सहकार्य करतात. अनेक खासगी संस्थांतील शिक्षकांना संस्थाचालक ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाच्या उमेदवारासाठी सर्व प्रकारच्या निवडणुकीत वेळ, पसा खर्च करावा लागतो त्यामुळे शिक्षणासारख्या दुय्यम बाबीकडे त्यांना लक्ष देणे अवघड जात असल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ते उत्तीर्ण होण्यासाठी जे लागेल ते सहकार्य करण्यावाचून शिक्षकांसमोर पर्याय राहात नाही.

या बाबी फारच चुकीच्या आहेत व त्या तातडीने बंद व्हायला हव्यात असे वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे, हा प्रश्नच आहे.

बारावी व दहावीच्या परीक्षेत लातूर जिल्हय़ात होत असलेल्या गरव्यवहाराची प्रकरणे समोर आली असून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. परीक्षा मंडळाच्यावतीने पाच विशेष भरारीपथके नव्याने तनात करण्यात आली असून ज्या ठिकाणी गरप्रकार होतात अशी शक्यता आहे अशा केंद्रांवर या पथकांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. बोरी येथील छायाचित्राशिवाय देण्यात आलेले हॉलतिकीट हे परीक्षा मंडळाकडेच संबंधित विद्यार्थ्यांचे छायाचित्र प्राप्त न झाल्यामुळे तसे घडले आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे छायाचित्र डकवून मुख्याध्यापकांकडून ते हॉलतिकीट प्रमाणित करण्याचे आदेश दिले आहेत.   गणपत मोरे, परीक्षा मंडळाचे प्रभारी सचिव