भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत. सिंचन घोटाळ्यातील तथ्य लाचलुचपत विभागाच्या तपासात समोर येईल. सोमय्या यांनी त्या सर्व कंपन्यांची नावे लवकरात लवकर जाहीर करावीत, असे आव्हानच तटकरे यांनी दिले.
ते रोहा तालुक्यातील सानेगाव येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. सिंचन घोटाळ्यातून काढण्यात आलेले ८०० कोटी रुपये हे अजित पवार व सुनील तटकरे यांच्याशी संबंधित ३०८ बोगस व बेनामी कंपन्यांमध्ये जमा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला होता. सोमय्या प्रसिद्धीसाठी असे आरोप करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एसीबीसमोर चौकशीसाठी हजर झाल्यानंतर तटकरे यांनी प्रथमच या संदर्भात जाहीर प्रतिक्रिया दिली.
सोमय्या यांनी सांगितलेल्या सर्व बोगस कंपन्यांची नावे लवकरात लवकर जाहीर करावीत, असे आव्हानही त्यांनी दिले. या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी त्याबाबत अधिक काही बोलणार नाही, परंतु चौकशीत सत्य बाहेर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या बोगस कंपन्यांमध्ये ठाकरे कुटुंबीय संचालक असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. या संदर्भात आपण बोलणे उचित नसून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे त्याबद्दल बोलू शकतील, असे तटकरे यांनी सांगितले.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान
five different political parties application to mumbai municipal corporation for shivaji park ground
‘शिवाजी पार्क’वर सभांचा धुरळा; मैदानासाठी पाच पक्षांचे महापालिकेकडे अर्ज