कर्जत तालुक्यात अनेक प्रगतशील शेतकरी विविध प्रयोग करून पिके घेण्याचा प्रयत्न करतात. कुणी टोमॅटो, कुणी वांगी, भेंडी, त्याचबरोबर भुईमूग, किलगड आदींची भरघोस पिके घेतात. आयुष्यभर भात पीक घेणारे शेतकरी परिस्थितीनुरूप पिके घेण्यास सरसावले आहेत. वदप गावातील अशाच एका शेतकऱ्याने परंपरागत भात पिकाऐवजी विविध पिके घेण्याचे निश्चित केले आणि त्याने केवळ वीस गुंठे जमिनीतून सुमारे दहा टन कोबीचे पीक काढण्याची तयारी केली आहे. येत्या दहा-बारा दिवसांत हे पीक तयार होत असून याचा हा प्रयोग दृष्ट लागण्यासारखा आहे.
भात शेती हा आतबट्टय़ाचा व्यवहार आहे. त्यामध्ये नेहमीच तोटा होतो असा सर्वसाधारण समज आहे. कर्जत तालुक्याच्या काही भागांत उन्हाळी मिळणाऱ्या पाण्यामुळे दुबार भात पीक घेतले जाते. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे डबल नुकसान होते, असा त्याचा अर्थ होतो. मात्र केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी काही शेतकारी भात पीक घेतात. जमीन ओसाड ठेवत नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून राजनाला कालव्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शेतीसाठी पाणी सोडले नसल्याने तेथील शेतकरी उन्हाळी भात पीक घेत नाहीत. पहिल्या वर्षी पाण्यासाठी आरडाओरडा करणाऱ्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या वर्षी कडधान्याचे पीक घेतले आणि त्यांना पिकाचा पर्याय मिळाला. अशाच एका शेतकऱ्याने आपल्या शेतावर विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली व आयुष्यभर फक्त भात पीकच आपल्या जमिनीत होते, घाटावरची किंवा अन्य पिके होत नाहीत हा गरसमज दूर केला. तालुक्यातील वदप गावातील विनय मारुती वेखंडे यांनी आपल्या केवळ अर्धा एकर जमिनीत कोबीची लागवड करून दहा टन पीक काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
विनय वेखंडे यांनी या पिकाचे फायद्याचे गणित मांडतांना ‘अर्धा एकर जमिनीवर २५ नोव्हेंबर २०१५ रोजी ७० ते ८० दिवसांत तयार होणाऱ्या सेंट जातीच्या कोबीची बारा हजार रुपयांची बारा हजार रोपे आपल्या जमिनीवर लावली. त्यासाठी त्यांनी पूर्वी वापरलेलाच माल्चीन पेपर वापरला. लागवडीपूर्वी पन्नास किलो सुफला १५:१५:१५ किंमत ९५० रुपये, तीन ट्रॅक्टर शेणखत- किंमत चार हजार रुपये व लागवड मजुरी १२०० रुपये. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे एक किलो १९:१९:१९ दिवसाआड दहा वेळा खर्च १६०० रुपये, पंचेचाळीस दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे ००:५२: ३४ एक किलो दिवसाआड चार वेळा खर्च ८०० रुपये, पंचावन्न दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारेच ००:००: ५० एक दिवस आड पाच वेळा खर्च ५०० रुपये अशी खतांची मात्रा दिली. किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास एक महिन्यापर्यंत क्लोरपायरी फॉस पन्नास टक्के आणि सायपर मेथ्रीस पाच टक्के दोन मिली प्रति लिटर अशी फवारणी केली. त्याकरिता २०० रुपये खर्च अपेक्षित धरला.
एक महिन्यानंतर किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास स्पिनोसॅड ७५ मिली दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली. त्या साठी १२५० रुपये खर्च. त्यानंतर दहा दिवसांनी पुन्हा कीड आढळल्यास इंडोक्झाकार्ब एक मिली एक लिटर पाण्यात याप्रमाणे फवारणी केली- त्याचा खर्च ८०० रुपये. तणनाशकाकरिता लागवडीपूर्वी दोस्त सुपर चार मिली एक लिटर पाण्यातून फवारले. २५ दिवसांनंतर एजील १.५ मिली फवारणी खर्च २५० रुपये, मजुरी १२०० रुपये, ठिबक सिंचन पाच हजार रुपयांचे व वाहतूक खर्च ४००० रुपये असा एकूण २५ हजार ७०० रुपये खर्च झाला. आठ-दहा दिवसानंतर पीक होईल ९.६ टन. घाऊक दर नऊ रुपये प्रति किलो असला तरी ८६ हजार ४०० रुपये मिळतात, म्हणजे ६० हजार रुपये नफा अपेक्षित आहे, असे सांगून मला या पिकासाठी सुहास अ‍ॅग्रो ट्रेडर्स, प्रगतशील शेतकरी बाळ दळवी व पंचायत समितीतील चिंचोळे व घायले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, असे विनय वेखंड यांनी नम्रपणे सांगितले.

onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…