विजेचा धक्का लागून मायलेकासहीत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर येथील ही घटना आहे. आज (शनिवारी) पहाटे शेताला पाणी देण्यासाठी गेलेले असताना या तिघांना विजेच्या तारांचा धक्का लागला. प्रभाकर महाडिक (वय ३५), छाया महाडिक (५०) या मायलेकासहीत प्रकाश मगदूम (४५) या शेतमजुराचा मृत्यू झाला.

ही घटना महाडिक यांच्या शेतात घडली. शेताला पहाटे पाणी देण्यासाठी प्रभाकर महाडिक आई छाया आणि त्यांच्याकडील मजूर मगदूम यांच्यासोबत शेतात गेले होते. तेथे विजेच्या खांबावरील तार तुटून पडलेली होती. अंधारात विजेची तार न दिसल्याने तिघांनाही विजेचा जोरदार धक्का लागला व तिघांचा जागीच मृत्यू झाला.