राज्यातील व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या कमी झालेली नसून उलट त्यात वाढ होऊन ती ३०३ वर गेली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणींचा मृत्यू झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जानेवारी २०१७ मध्ये एक वाघिण मृतावस्थेत सापडली तर फेब्रुवारी २०१७ मध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला. दोन वाघांच्या झुंझीत झालेल्या अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला होता. या दोन्ही वाघ वाघिणींचे शव विच्छेदनासाठी पाठवला असता वाघिणीचा विसेरा व घटनास्थळाजवळच्या पाणवठ्यातील पाण्याचे नमुने न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, वाघांची संख्या वाढत चालली आहे. जय नावाचा वाघ हा फिरत फिरत दुसऱ्या जंगलात गेला असून तसा अहवाल तंत्रज्ञांनी दिला आहे. आजुबाजुच्या राज्यांची जंगले लागूनच असल्याने हे वाघ फिरत फिरत जात असतात, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 30, 2017 8:46 pm