मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांक

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या देशातील दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला  नाही.

Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
holi color
कोल्हापूरसह राज्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रंगपंचमी; खरेदीला उधाण
female elephant Rani gave birth to calf in the Kamalapur Elephant Camp
गुडन्यूज! राज्यातील एकमेव ‘हत्तीकॅम्प’मध्ये पाळणा हलला, होळीच्या दिवशी ‘राणी’ने दिला गोंडस पिलाला जन्म

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार दिला जातो. २०२० मधील दहा पोलीस ठाण्यांची यादी गुरुवारी गृहमंत्रालयाने जाहीर केली. मणिपूरमधील थोंबूल जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला पहिला पुरस्कार मिळाला. दुसरा क्रमांक तमिळनाडूतील सालेम शहर तर तिसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशमधील चँगलँग जिल्ह्य़ातील पोलीस ठाण्याला मिळाला.

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या दादरा नगर- हवेली खानवेल पोलीस ठाण्याचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे.

गोवा, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार, सिक्कीम, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधील पोलीस ठाण्यांचा दहा जणांच्या यादीत समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलीस ठाण्याचा समावेश झालेला नाही.

देशातील १६,६७१ पोलीस ठाण्यांमधून दहा पोलीस ठाण्यांना पुरस्कार दिला जातो. यासाठी गृहमंत्रालयाने निकष निश्चित के ले आहेत. प्रत्येक राज्यातून तीन पोलीस ठाण्यांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या यादीतून दहा उत्कृष्ट पोलीस ठाण्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुन्ह्य़ांचा छडा लावण्याचे प्रमाण, महिला व दुर्बल घटकांच्या विरोधातील गुन्ह्य़ांच्या तपासाचे प्रमाण आदी १९ निकष निश्चित करण्यात आले होते.