औरंगाबाद मध्ये खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सोहेल शफीक पठाण ( वय ११) आणि शेख युसुफ शेख युनूस (वय १३) अशी या मुलांची नावे आहेत. सोमवारी दुपारी यासीन कॉलनीत राहणारे सोहेल आणि शेख युसुफ हे दोघे शाळेतून घरी आल्यावर अडीचच्या सुमारास फिरायला जातो असे सांगून घराबाहेर बाहेर पडले.
अरबी शाळेजवळील खड्ड्यात पाणी भरले होते.सोहेल आणि युसुफ दोघेही पोहायला पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. स्थानिकांना घटनेची माहिती मिळताच दोघांनाही बाहेर काढले. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. युसुफ चे वडील रिक्षाचालक असून सोहेल चे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.