गरजूंना अन्नदान करून परतत असताना रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. बुधवारी रात्री अमळनेर येथे हा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात टाळेबंदी असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. अशाच लोकांना मदत करून परतत असताना हा अपघात झाला. अमळनेर येथील श्रीरामनगर परिसरातील आठ युवक गरजूंना अन्नदान करण्यासाठी झाडी आणि मुडी गावाला गेले होते. मुडी येथून परतत असतांना झाडी गावाजवळ अचानक त्यांची रिक्षा उलटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.

ऋषिकेश उमेश शेटे आणि विशाल दिनेश पाटकरी अशी या दोघांची नावे आहेत. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी जयेश पाटील याची प्रकृती चिंताजनक आहे. अक्षय महाजन आणि चेतन चौधरी हे किरकोळ जखमी असून जखमींना धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed in reverse rickshaw return abn
First published on: 10-04-2020 at 00:17 IST