मुंबईहून राजापूरकडे कोतापूरच्या गावी कार्यासाठी जाणाऱ्या एका क्वालिस कारला (एमएच १४-पी ६२६५) एका अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकीमुळे २ ठार व ४ जण जखमी झाले. हे सगळे मुंबईचे रहिवासी होते. हा अपघात आज सकाळी ७.२० वा. झाला.
या अपघातात सचिन भिकूराम धोत्रे (२२) व सनी विलास खैरे (२१) अशी मृतांची नावे असून परेश कांबळे, यशवंत जाधव, चिंतन वाघमोरे, परितोष जाधव या गंभीर जखमींना आधी रत्नागिरीच्या खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर त्यांना मुंबईला हलविण्यात आले.