गडचिरोली जिल्ह्यात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत दोन नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर पाच अन्य नक्षलवादी जखमी झाले आहेत. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती गावालगतच्या नरकसा जंगलात सकाळी ही चकमक झाली. #Maharashtra: Two naxals killed in encounter with security forces in Gadchiroli's Gyarapatti village. — ANI (@ANI) September 15, 2019 चकमकीत ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक पुरुष आणि एका महिला नक्षलीचा समावेश आहे. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले आहेत. शिवाय या चकमकीत पाच नक्षलवादी देखील जखमी झाले असल्याची माहिती आहे. नारेकसा जंगलात 'सी-60' पथकाचे जवान नक्षलवादविरोधी अभियान राबवत असताना त्यांच्यावर नक्षलवाद्यांकडून गोळीबार केला गेला. या हल्ल्याला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन नक्षलवादी ठार झाले. यावेळी जवानांनी या परिसरातील नक्षलींचे अड्डे देखील उद्ध्वस्त केले. शिवया घटनास्थळावरून मोठाशस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवली होती.