निसर्ग चक्रीवादळाचा अंदाज लक्षात घेऊन पालघरमध्ये NDRF ची दोन पथकं पालघरमध्ये तैना तैनात करण्यात आली आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अर्थात एनडीआरएफच्या ९ टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी तीन टीम्स मुंबईतीही तैनात करण्यात आल्या आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. Maharashtra: Two National Disaster Response Force (NDRF) teams have been deployed in Palghar in view of #CycloneNisarga; total 9 teams have been deployed in the State including 3 in Mumbai. pic.twitter.com/HPfgCRvBCA — ANI (@ANI) June 1, 2020 निसर्ग या चक्रीवादळाची तीव्रता पुढील ४८ तासांमध्ये वाढू शकते. वायव्य दिशेकडे वाटचाल करत हे वादळ ३ जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल असा अंदाज हवामाव विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीवर २ ते ४ जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातल्या काही भागांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.