पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानकपणे अवकाळी पावसाच्या धारा बरसू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असून शेतीचं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे फळपिकं, भाजीपाला शेतीचं नुकसान होणार आहे.

पुढील चार ते सहा तासांच्या दरम्यान कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व बेळगावमधील काही भागात जोरदार वारा, ढगांच्या गडगडाटासह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.