'लोकसत्ता' मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी वक्तृत्व स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी अभिनेते नाना पाटेकर यांनी आवर्जून हजेरी लावली. ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, नगर, रत्नागिरी, नागपूर आणि औरंगाबाद अशा आठ विभागांमधून ही स्पर्धा घेण्यात आली. याच स्पर्धेत पहिली तीन पारितोषिके जिंकणाऱ्या स्पर्धकांची भाषणे खास लोकसत्ता ऑनलाइनच्या वाचकांसाठी. प्रथम क्रमांक: रिद्धी म्हात्रे, मुंबई द्वितीय क्रमांक: अभिजीत खोडके, नागपूर तृतीय क्रमांक: स्वानंद गांगल, ठाणे यावेळी प्रमुख पाहुणे अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले मत व्यक्त केले