ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादात धमकीमुळे एका युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निमगाव मढ येथे घडली असून याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दाखल करून ती मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याने आपल्या मुलाने आत्महत्या केली या आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून निमगाव मढ येथील नवनाथ लभडे यांच्या विरुद्ध येवला तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.  अशोक बगाजी लभडे यांनी येवला तालुका पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीत आपला मुलगा दत्तात्रय लभडे (२६) याविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून नवनाथ बबन लभडे याने येवला तालुका पोलिसात खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप केला आहे. ही फिर्याद मागे घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणीही नवनाथने केली. त्यामुळे दत्तात्रयने विहिरीत आत्महत्या केल्याचे त्यांनी म्हटले आहे. युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नवनाथविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.