विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन.'; हा 'डॉयलॉग' विधानसभेत पुन्हा गाजला. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की 'मी पुन्हा येईन..'. ते आले पण कोणत्या बाकावर बसणार हे त्यांनी सांगितले नव्हते. आता ते विरोधी बाकावर बसले आहेत. त्यांच्या या चर्चेनंतर मी पुन्हा येईन या वाक्याची चर्चा जोरात रंगली. अभिनंदनीय भाषणांना उत्तर देताना आणि विरोधी पक्षनेते म्हणून यावेळचे पहिले भाषण करताना त्यांनी आपल्या त्या वाक्याचे समर्थन केले. ते म्हणाले, ''हे खरं आहे की मी म्हटलं होतं, मी पुन्हा येईन. मी कुठे नाही म्हटलं. अशा गोष्टी लोकशाहीमध्ये होत असतात. महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं. १०५ आमदार निवडून दिले आहेत. जनतेचीच इच्छा होती. जनादेश तोच होता. जनादेशाचा सन्मान आम्ही ठेऊ शकलो नाहीत. ही गोष्ट वेगळी आहे. मी आता अशी त्यात सुधारणा करतो की मी, तेव्हा टाईमटेबल सांगितला नव्हता. मी पुन्हा येईन, म्हणालो होतो. टाईम सांगितला नव्हता. त्यामुळे वाट बघा.'' त्यानंतर त्यांनी पुढील शेर ऐकवून 'मी पुन्हा येईन' या आपल्या वाक्याचे समर्थन केले. ''मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा'' #WATCH Former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis in state assembly, earlier today: Mera paani utarta dekh, mere kinaare par ghar mat basaa lena. Mera paani utarta dekh, mere kinaare par ghar mat basaa lena. Mai samudra hoon, laut kar wapas ayunga. pic.twitter.com/lHaNNjxPV2 — ANI (@ANI) December 1, 2019 या ओळींनंतर भाजपाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाषण संपवताना फडणवीस म्हणाले की, ''भुजबळ साहेब इतकं घाबरू नका. पुन्हा आलो तर तुमच्या सकट येतो. आता राजकारणात काहीही अशक्य राहिलेले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आलात, त्यानंतर अशक्य असं काहीही राहिलेलं नाही.'' उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस म्हणाले. “उद्धव ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध. काही कारणानं ते दुरावले. पण, तरीही मी मुख्यमंत्र्यांना आश्वासन देतो की, कधीही आवाज द्या. आम्ही नेहमीच सहकार्य करू. जनहिताच्या निर्णयासाठी आम्ही सोबत असू, पण, सरकार जर जनतेच्या आकांक्षाची पूर्तता करत नसेल तर आसूड ओढायला मागे पुढे पाहणार नाही,”