निवडणूका आल्या की देशाला धोका कसा होता आणि निवडणूका संपल्या की सर्व शांतता असते असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी मोदी सरकार ला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात देशाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ब्लास्ट होण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणेला सोबत घेऊन संबंधिताला पकडा जनतेला कशाला सांगत आहात तुम्हाला निवडणून त्यासाठीच दिल आहे. हे सरकार मस्तावलेलं बेलगाम घोडे असल्याची टीका देखील आंबेडकर यांनी केली आहे ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान मोदींना समजलं की आपण निवडणूक हारत आहोत. आपल्याला पाहिजे तस यश येत नाही, तेव्हा, मोदी म्हणत आहेत देशाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे आणि ब्लास्ट होण्याची शक्यता आहे. एवढी माहिती मिळाली असेल की ब्लास्ट होणार आहे. संरक्षण यंत्रणेला सोबत घेऊन संबंधिताला पकडा, लोकांना कशाला सांगताय? तुमचं जे सरकार आहे लोकांनी मतदान केलेले आहे ते माहिती देण्यासाठी नाही. तर जो कोणी असेल त्याला पकडण्यासाठी दिलं आहे, मग पकडत का नाही. निवडणूक आल्या की देशाला धोका कसा होता? निवडणूक संपल्या की सर्व शांतता होते असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, एका ने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. आर.एस.एस. चा एक प्रचारक आहे. तो माझ्या माहीतीतील आहे. पत्रकार परिषदेत सांगितलं की देशांमधील जेवढे ब्लास्ट झाले तेवढ्यामध्ये माझा हात आहे. संघाचा मोठा प्रचारक, याची सर्व माहिती मोहन भागवत यांना होती. हे केवळ आमच्या दोघांनाच होती अस ते म्हणाले. कोण खर बोलतय कोण खोट बोलतय हेच कळायला मार्ग नाही. ज्याने हे विधान केले त्याला पोलिसांनी बोलावलं नाही अस आंबेडकर म्हणाले.

खोट्या राष्ट्रवादात अडकू नका अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचे पती पत्नीला म्हणतात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे बसावं आणि अर्थव्यवस्थेतील धडे घ्यावेत. अजून पाच नॅशनलाइज बँक डुबणार आहेत. त्या डूबण्यापासून वाचवणे आपल्या हातात आहे. हे मस्तावलेलं सरकार आहे, निवडणुकांचे निकाल अगोदरच जाहीर होत आहेत. जिंकणार आहात तर निवडणुका कशाला लढवत आहात निवृत्त व्हा. मस्तावलेलं बेलगाम घोडे आहे त्याचा लगाम पकडण्याची गरज आहे. त्याला वठणीवर आणणार असल्याचा निश्चय प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केला आहे