शिवसेनेकडून दररोज पक्षाची भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावरील पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. त्यांनी नाव न घेता राऊतांवर टीका केली. शिवसेनेकडून दररोज बोलणाऱ्या काही नेत्यांनी दरी वाढवण्याचं काम केलं. बोलण्यामुळे त्यांना मीडिया स्पेस नक्की मिळते पण अशा बोलण्याने सरकार बनत नाही. तुम्ही ज्या भाषेत बोलता त्या भाषेत आम्हाला उत्तर देता येत नाही असं समजू नका. आम्ही सुद्धा तुमच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. पण आम्हाला अशा पद्धतीचं बोलणं शोभत नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. Interaction with media in Mumbai. https://t.co/4Ky4bWI4X1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 8, 2019 आम्ही तोडणारी नाही जोडणार लोक आहोत. आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही. आम्ही उद्धवजींबद्दल एकही वक्तव्य केलं नाही. गेल्या दहा दिवसात नरेंद्र मोदींवर ज्या खालच्या दर्जाची टीका झाली. त्यामुळे अशा सरकारमध्ये सोबत रहाव का? हा प्रश्न माझ्या मनात आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.