विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राला नवं सरकार कधी मिळणार इतकाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपापाठोपाठ युतीतला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आलेला नाही. त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादीला आज सायंकाळपर्यंत वेळ देण्यात आला असून, राष्ट्रवादीला आव्हान पेलवणार का? या प्रश्नाचं उत्तर दिवसअखेर दिसणार आहे.