महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अद्याप बहुमत जमवता आले नसल्याचे कबूल केले आहे.

“विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अद्याप बहुमत जमवता आलेले नाही. उद्यापर्यंत आम्ही नक्कीच बहुमताचा आकडा गाठू ” असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.