महाराष्ट्रातल्या राजकीय पेचाबाबत सोनिया गांधी यांना माहिती दिली. मात्र या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असू. महाराष्ट्रात सरकार स्थापण्यावर चर्चा झाली का? यावर शरद पवार यांनी नाही असं उत्तर दिलं आहे. सोनिया गांधी यांना भेटून आल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? सरकार स्थापन करायचं की नाही? या कोणत्याही प्रश्नांवर चर्चाच झाली नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसंच आघाडीतल्या मित्रपक्षांनाही नाराज करुन चालणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा तिथे ए. के. अँटनीही हजर होते असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच का सुटत नाही यावरच आम्ही चर्चा करतो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जो काही पेच निर्माण झाला त्याबाबत सोनिया गांधी यांना मी माझ्या परिने माहिती दिली.

सोनिया गांधीसोबत चर्चेनंतर शरद पवार यांनी काय म्हटलं?

  • महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? सरकार स्थापन करायचं का? यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.
  • शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात  सोनिया गांधी यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही
  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा नाही
  • सत्तास्थापनेचं काय करायचं ते भाजपा आणि शिवसेना पाहून घेतील
  • एकसूत्री कार्यक्रमाबाबत कोणतीही चर्चा नाही

शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम आहे असंच दिसून येतं आहे.