विरोधकांना चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची भीती दाखवत सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करीत आहेत. मात्र, आता बस्स झालं तुमची ईडी असो किंवा काही तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. पंढरपूर येथे भारत भालके यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कामकाजावर सडकून टीका केली.

पवार म्हणाले, “आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा इतर काही…तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही.”